Home शैक्षणिक दहावी बारावी नंतर काय? शृंगारतळी येथे १० जून रोजी पालक-विद्यार्थ्यांसाठी विना शुल्क मार्गदर्शन- प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम

दहावी बारावी नंतर काय? शृंगारतळी येथे १० जून रोजी पालक-विद्यार्थ्यांसाठी विना शुल्क मार्गदर्शन- प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

दहावी बारावी नंतर काय? शृंगारतळी येथे १० जून रोजी पालक-विद्यार्थ्यांसाठी विना शुल्क मार्गदर्शन- प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम

 


(दिशा महाराष्ट्राची – उदय दणदणे)

दहावी बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून विद्यार्थी पालकांमध्ये दहावी-बारावी नंतर पुढे काय? याची चिंता सतावत असते. मात्र ही विद्यार्थी-पालकांची चिंता आता दूर होणार असून, सातत्याने शैक्षणिक गुणवत्तावर भर देणारे गुहागर तालुक्यातील समाजनेते, गुहागर तालुका मनसे संपर्क प्रमुख अध्यक्ष तसेच “कोकण कट्टा” संस्थापक- प्रमोद गांधी यांच्या वतीने सोमवार दिनांक- १० जून २०२४ रोजी ओंकार मंगल कार्यालय,लगुन कुटीरच्या जवळ, गुहागर- चिपळूण रोड, शृंगारतळी, ता. गुहागर येथे विद्यार्थी- पालकांसाठी “विना शुल्क” करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असून, दहावीसाठी सकाळी – १० वा. तर बारावीसाठी सकाळी ११-३० वा. मार्गदर्शन सत्र होईल.

सदर मार्गदर्शन सत्राला वक्ते म्हणून डॉ. नरेंद्र सोनी- प्राचार्य (महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-वेळणेश्वर) यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी – पालकांनी ह्या विना शुल्क मार्गदर्शन सत्राचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन समाजनेते प्रमोद गांधी यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Comment